Cue3

Thursday, January 30, 2020

अपुऱ्या आच्छादनामुळे मुंबईची मोहीम संकटात

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईची मोहीम साखळीतच संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल पावसामुळे न लागल्याने मुंबई एलीट गटात तेराव्या स्थानावर गेले आहेत. अव्वल पाच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे आता अखेरच्या दोन साखळी लढती जिंकल्यासच मुंबईला बाद फेरीची आशा असेल.

आंतरराष्ट्रीय लढती होत असलेल्या धरमशाला येथे ही लढत होती, तरीही या सामन्यात तीन दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. आदल्या रात्री पडणाऱ्या पावसामुळे तसेच थंडीमुळे मैदान सुकत नव्हते. त्यामुळे तीनही दिवस खेळ झाला नाही. अर्थात दोष पूर्ण पावसाचा नव्हता तर संयोजक हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचा होता.

प्रत्येक संलग्न संघटनेकडे मैदान पूर्ण आच्छादित करणारी कव्हर असावेत यासाठी भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आग्रही आहेत, पण या सामन्याच्यावेळी मैदान केवळ तीस यार्डच आच्छादित होते. यामुळे गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश-बडोदा लढतीत एका दिवसाचा खेळ वाया गेल्यावरही हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी त्यातून काही शिकले नाहीत.

पावसाचा अंदाज असूनही हिमाचल प्रदेश संघटनेने पुरेशी काळजी घेतली नाही, यामुळे मुंबई संघव्यवस्थापन नाराज होते. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने केवळ धरमशालाच्या मैदानासाठी असलेली कव्हरपैकी निम्मी उना येथे पाठवली होती. तिथे 23 वर्षांखालील महिलांची एकदिवसीय स्पर्धा सुरू आहे, पण अपुऱ्या कव्हरमुळे तेथील सामनेही होत नाहीत.

आंतरराष्ट्रीय लढतीचे काय?
हिमाचल प्रदेश संघटनेची कव्हर खराब झाली आहेत, असेही काहींचे मत आहे. धरमशाला येथे पुढील महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय लढत आहे. त्यावेळी पाऊस झाल्यास लढत कशी होईल, अशी विचारणा होत आहे. मात्र तोपर्यंत नवीन कव्हर येणार असल्याचे काही पदाधिकारी सांगतात.

अवघड केलेली मोहीम
आता जास्तच खडतर

आम्ही पूर्ण ताकदीने खेळत असताना हार पत्करली होती. या पिछाडीतून सावरणे अवघड असते. त्यातच आता मैदान पूर्ण आच्छादित नसल्याचा फटका बसला, अशी खंत मुंबईचे मार्गदर्शक विनायक सामंत यांनी व्यक्त केली. आपण दोन लढती गमावल्याने कामगिरी अवघड झाली. त्यावेळी संघ पूर्ण ताकदीने खेळला होता. दोन सामन्यांत खराब खेळलो. चॅम्पियन संघाने त्याच दर्जाचा खेळ करणे सतत आवश्‍यक असते. तसे नाही झाले की या प्रकारचे प्रश्‍न निर्माण होतात. आता पावसामुळे आव्हान अवघड झाले आहे. दोन सामन्यात जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न असेल. अखेरच्या घडीला झगडणे जास्त त्रासदायक होते, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई तेरावे, आव्हान चांगलेच अवघड
मुंबईचे आता पाच सामन्यांतून 12 गुण आहेत, तर पाचव्या क्रमांकावरील बंगालचे 19. सर्व सात साखळी सामने झालेले उत्तर प्रदेश 20 गुणांसह चौथे आहेत. आता दोन्ही लढती जिंकल्यासच मुंबईला आशा असेल. विदर्भ, कर्नाटकचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत आणि त्यांचे 17 गुण आहेत. एक सामना शिल्लक असलेल्या पंजाबचे 18 गुण आहेत. याशिवाय दिल्ली, राजस्थान, बडोदा (प्रत्येकी 16) यांनीही मुंबईसमोरील आव्हान वाढवले आहे. यापैकी दोन लढती शिल्लक असलेले दिल्ली जास्त डोकेदुखी ठरतील. आंध्र प्रदेश (27) आणि सौराष्ट्र (25) या आघाडीवरील संघांचा प्रत्येकी एक तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातचे (20) दोन सामने बाकी आहेत.

News Item ID: 
599-news_story-1580405316
Mobile Device Headline: 
अपुऱ्या आच्छादनामुळे मुंबईची मोहीम संकटात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईची मोहीम साखळीतच संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल पावसामुळे न लागल्याने मुंबई एलीट गटात तेराव्या स्थानावर गेले आहेत. अव्वल पाच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे आता अखेरच्या दोन साखळी लढती जिंकल्यासच मुंबईला बाद फेरीची आशा असेल.

आंतरराष्ट्रीय लढती होत असलेल्या धरमशाला येथे ही लढत होती, तरीही या सामन्यात तीन दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. आदल्या रात्री पडणाऱ्या पावसामुळे तसेच थंडीमुळे मैदान सुकत नव्हते. त्यामुळे तीनही दिवस खेळ झाला नाही. अर्थात दोष पूर्ण पावसाचा नव्हता तर संयोजक हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचा होता.

प्रत्येक संलग्न संघटनेकडे मैदान पूर्ण आच्छादित करणारी कव्हर असावेत यासाठी भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आग्रही आहेत, पण या सामन्याच्यावेळी मैदान केवळ तीस यार्डच आच्छादित होते. यामुळे गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश-बडोदा लढतीत एका दिवसाचा खेळ वाया गेल्यावरही हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी त्यातून काही शिकले नाहीत.

पावसाचा अंदाज असूनही हिमाचल प्रदेश संघटनेने पुरेशी काळजी घेतली नाही, यामुळे मुंबई संघव्यवस्थापन नाराज होते. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने केवळ धरमशालाच्या मैदानासाठी असलेली कव्हरपैकी निम्मी उना येथे पाठवली होती. तिथे 23 वर्षांखालील महिलांची एकदिवसीय स्पर्धा सुरू आहे, पण अपुऱ्या कव्हरमुळे तेथील सामनेही होत नाहीत.

आंतरराष्ट्रीय लढतीचे काय?
हिमाचल प्रदेश संघटनेची कव्हर खराब झाली आहेत, असेही काहींचे मत आहे. धरमशाला येथे पुढील महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय लढत आहे. त्यावेळी पाऊस झाल्यास लढत कशी होईल, अशी विचारणा होत आहे. मात्र तोपर्यंत नवीन कव्हर येणार असल्याचे काही पदाधिकारी सांगतात.

अवघड केलेली मोहीम
आता जास्तच खडतर

आम्ही पूर्ण ताकदीने खेळत असताना हार पत्करली होती. या पिछाडीतून सावरणे अवघड असते. त्यातच आता मैदान पूर्ण आच्छादित नसल्याचा फटका बसला, अशी खंत मुंबईचे मार्गदर्शक विनायक सामंत यांनी व्यक्त केली. आपण दोन लढती गमावल्याने कामगिरी अवघड झाली. त्यावेळी संघ पूर्ण ताकदीने खेळला होता. दोन सामन्यांत खराब खेळलो. चॅम्पियन संघाने त्याच दर्जाचा खेळ करणे सतत आवश्‍यक असते. तसे नाही झाले की या प्रकारचे प्रश्‍न निर्माण होतात. आता पावसामुळे आव्हान अवघड झाले आहे. दोन सामन्यात जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न असेल. अखेरच्या घडीला झगडणे जास्त त्रासदायक होते, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई तेरावे, आव्हान चांगलेच अवघड
मुंबईचे आता पाच सामन्यांतून 12 गुण आहेत, तर पाचव्या क्रमांकावरील बंगालचे 19. सर्व सात साखळी सामने झालेले उत्तर प्रदेश 20 गुणांसह चौथे आहेत. आता दोन्ही लढती जिंकल्यासच मुंबईला आशा असेल. विदर्भ, कर्नाटकचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत आणि त्यांचे 17 गुण आहेत. एक सामना शिल्लक असलेल्या पंजाबचे 18 गुण आहेत. याशिवाय दिल्ली, राजस्थान, बडोदा (प्रत्येकी 16) यांनीही मुंबईसमोरील आव्हान वाढवले आहे. यापैकी दोन लढती शिल्लक असलेले दिल्ली जास्त डोकेदुखी ठरतील. आंध्र प्रदेश (27) आणि सौराष्ट्र (25) या आघाडीवरील संघांचा प्रत्येकी एक तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातचे (20) दोन सामने बाकी आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
lack of proper covers hampers mumbai
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
रणजी करंडक, करंडक, Trophy, क्रिकेट, cricket, मुंबई, Mumbai, हिमाचल प्रदेश, धरमशाला, लढत, fight, थंडी, मैदान, ground, भारत, महिला, women, एकदिवसीय, ODI, स्पर्धा, Day, दक्षिण आफ्रिका, पाऊस, उत्तर प्रदेश, विदर्भ, Vidarbha, राजस्थान, आंध्र प्रदेश
Twitter Publish: 
Meta Description: 
lack of proper covers hampers mumbai रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईची मोहीम साखळीतच संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल पावसामुळे न लागल्याने मुंबई एलीट गटात तेराव्या स्थानावर गेले आहेत. अव्वल पाच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे आता अखेरच्या दोन साखळी लढती जिंकल्यासच मुंबईला बाद फेरीची आशा असेल.
Send as Notification: 


from News Story Feeds https://ift.tt/36DLUdX

No comments:

Post a Comment