Cue3

Friday, September 13, 2019

सुरक्षा तपासणीनंतरच भारत-पाक लढतीचा निर्णय

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल. 

भारत वि. पाकिस्तान ही डेव्हीस करंडक स्पर्धेतील लढत 29 -30 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबर - 1 डिसेंबरला इस्लामाबादमध्ये होईल. या लढतीच्या सुरक्षेचा आढावा 4 नोव्हेंबरला घेण्यात येईल. त्यानंतर लढत इस्लामाबादला होणार की त्रयस्थ ठिकाणी, याबाबतचा निर्णय होईल, असे भारतीय टेनिस संघटनेने कळवले आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने 14-15 सप्टेंबरला पाकिस्तानात होणारी ही लढत लांबणीवर टाकण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला होता. भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढलेला असल्याने लढत लांबणीवर टाकण्याची अथवा त्रयस्थ ठिकाणी लढत खेळवण्याची मागणी भारताकडून झाली होती. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचा हा निर्णय खूपच विचारपूर्वक आहे. महासंघाची निवडणूक 27 सप्टेंबरला आहे. सध्या भारतीय संघटनेचे अनिल खन्ना आंतरराष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. अर्थातच हे सर्व विचारात घेऊनच नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला, असे मानले जात आहे. 

सुरक्षा आढाव्याचा आयटीएफकडून उल्लेख नाही 
भारतीय टेनिस संघटनेच्या पत्रकात 4 सप्टेंबरला भारत-पाक लढतीबाबत सुरक्षा आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे, पण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या पत्रकात याचा उल्लेख नाही. त्यांनी पाकिस्तान 19 सप्टेंबरला लढतीच्या अंतिम तारखा ठरवेल, असे सांगतानाच आयटीएफ पाकमधील सुरक्षेचा आढावा घेत राहील, एवढेच सांगितले आहे. 

 

News Item ID: 
599-news_story-1568396497
Mobile Device Headline: 
सुरक्षा तपासणीनंतरच भारत-पाक लढतीचा निर्णय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल. 

भारत वि. पाकिस्तान ही डेव्हीस करंडक स्पर्धेतील लढत 29 -30 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबर - 1 डिसेंबरला इस्लामाबादमध्ये होईल. या लढतीच्या सुरक्षेचा आढावा 4 नोव्हेंबरला घेण्यात येईल. त्यानंतर लढत इस्लामाबादला होणार की त्रयस्थ ठिकाणी, याबाबतचा निर्णय होईल, असे भारतीय टेनिस संघटनेने कळवले आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने 14-15 सप्टेंबरला पाकिस्तानात होणारी ही लढत लांबणीवर टाकण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला होता. भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढलेला असल्याने लढत लांबणीवर टाकण्याची अथवा त्रयस्थ ठिकाणी लढत खेळवण्याची मागणी भारताकडून झाली होती. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचा हा निर्णय खूपच विचारपूर्वक आहे. महासंघाची निवडणूक 27 सप्टेंबरला आहे. सध्या भारतीय संघटनेचे अनिल खन्ना आंतरराष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. अर्थातच हे सर्व विचारात घेऊनच नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला, असे मानले जात आहे. 

सुरक्षा आढाव्याचा आयटीएफकडून उल्लेख नाही 
भारतीय टेनिस संघटनेच्या पत्रकात 4 सप्टेंबरला भारत-पाक लढतीबाबत सुरक्षा आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे, पण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या पत्रकात याचा उल्लेख नाही. त्यांनी पाकिस्तान 19 सप्टेंबरला लढतीच्या अंतिम तारखा ठरवेल, असे सांगतानाच आयटीएफ पाकमधील सुरक्षेचा आढावा घेत राहील, एवढेच सांगितले आहे. 

 

Vertical Image: 
English Headline: 
india pakistan davis cup match dectsion of security report
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
भारत, पाकिस्तान, टेनिस, लढत
Twitter Publish: 
Meta Description: 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल. 
Send as Notification: 


from News Story Feeds https://ift.tt/2LVZXn4

No comments:

Post a Comment