नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील द्वंद्व सर्वांना माहिती आहेच. आता यात आणखी भर पडली असून, आफ्रिदीने चक्क गंभीरला अक्कल कमी असल्याचे म्हटले आहे.
Shahid Afridi responds to Gautam Gambhir's suggestion that India should forfeit any World Cup matches versus Pakistan "Does this look like something which a sensible person would say? Do educated people talk like this?" #CWC19 pic.twitter.com/wYgtoOMI5k
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 24, 2019
पूर्व दिल्लीतून भाजपकडून खासदार झालेल्या गौतम गंभीरबाबत आफ्रिदीला विचारले असता त्याने हे उत्तर दिले. भर मैदानात या दोघांमधील वाद पाहायला मिळालेले होते. त्यानंतर नुकतेच पुलवामा हल्ल्यावरून गंभीर पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको हवेत असे म्हटले होते. भारताने पाकिस्तानसोबत खेळातही संबंध ठेवू नये असे म्हटले होते. याविषयी आफ्रिदीला पत्रकार परिषदेत विचारले असता आफ्रिदीने हे वक्तव्य केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत 16 जूनला सामना आहे.
आफ्रिदी म्हणाला, की पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये हे गौतमने म्हटले असल्याने त्याच्या बुद्धीवरून कळत आहे की त्याला काही अक्कल नाही. शिक्षित लोक कधी अशी वक्तव्ये करत नाहीत. हा मूर्खपणा आहे. नागरिकांनी ज्याला निवडून दिले त्याला काही अक्कल नाही.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील द्वंद्व सर्वांना माहिती आहेच. आता यात आणखी भर पडली असून, आफ्रिदीने चक्क गंभीरला अक्कल कमी असल्याचे म्हटले आहे.
Shahid Afridi responds to Gautam Gambhir's suggestion that India should forfeit any World Cup matches versus Pakistan "Does this look like something which a sensible person would say? Do educated people talk like this?" #CWC19 pic.twitter.com/wYgtoOMI5k
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 24, 2019
पूर्व दिल्लीतून भाजपकडून खासदार झालेल्या गौतम गंभीरबाबत आफ्रिदीला विचारले असता त्याने हे उत्तर दिले. भर मैदानात या दोघांमधील वाद पाहायला मिळालेले होते. त्यानंतर नुकतेच पुलवामा हल्ल्यावरून गंभीर पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको हवेत असे म्हटले होते. भारताने पाकिस्तानसोबत खेळातही संबंध ठेवू नये असे म्हटले होते. याविषयी आफ्रिदीला पत्रकार परिषदेत विचारले असता आफ्रिदीने हे वक्तव्य केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत 16 जूनला सामना आहे.
आफ्रिदी म्हणाला, की पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये हे गौतमने म्हटले असल्याने त्याच्या बुद्धीवरून कळत आहे की त्याला काही अक्कल नाही. शिक्षित लोक कधी अशी वक्तव्ये करत नाहीत. हा मूर्खपणा आहे. नागरिकांनी ज्याला निवडून दिले त्याला काही अक्कल नाही.


from News Story Feeds http://bit.ly/2wmeeSv
No comments:
Post a Comment