ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयाचा इतिहास घडवणारा टीम इंडियाा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने आपल्या झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन मायदेशातही कायम ठेवले. अतिशय चुरशीच्या झालेल्या कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात पुजाराने शतक करून आपल्या सौराष्ट्र संघाला पराभवाच्या वाटेवरून परत आणले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याने 49 वे शतक केले. पण हा आनंद पुजारा मोकळेपणे किंवा खुल्या मनाने साजरा केला असेल ? नक्कीच नाही. सौराष्ट्राच्या विजयाची आणि पुजाराच्या शतकापेक्षा त्याच्या खिलाडूवृत्तीचीच अधिक चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.
प्रेमात, युद्धात आणि आता खेळातही
प्रेमात, युद्धात आणि त्या जोडीला आता खेळामध्ये जिंकण्यासाठी सर्व काही माफ असते असे बोलले जात असले तरी प्रत्येक खेळात काही आदर्श आहेत, खिलाडूवृत्तीचे मुर्तीमंत उदाहरणेही आहेत. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, महेंद्रसिंग धोनी आणि आत्ता चेतेश्वर पुजारा. पण हा पुजारा सध्या अखिलाडूवृत्तीमुळे सध्या सोशल मिडियावर ट्रोल झाला आहे. कारणही तसेच आहे.
काय घडले?
कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात त्याच्या सौराष्ट्राला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान असताना त्यांची 3 बाद 23 अशी अवस्था झाली होती. पुजारा मैदानात आला आणि कमालीचा भेदक मारा करणाऱ्या विनय कुमारच्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड लागलेला चेंडू यष्टीरक्षक समर्थच्या हाती स्थिरावला, त्यानंतर जोरदार अपिल झाले. कर्नाटकच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. सौराष्ट्रासाठी त्यांचा खेळ खल्लासच झाला होता, परंतु पंचांना चेंडूंना बॅटची कडा लागलेला आवाज ऐकला नाही आणि पुजाराला त्यांना नाबाद ठरवले या जीवदानाचा फायदा घेत पुजाराने नाबाद 131 धावा करून संघाला अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. ही झाली घटना..कर्नाटकचे खेळाडू अजूनही विश्वास ठेऊ शकत नाहीत आणि क्रिकेट चाहते पुजारासारखा खेळाडू अखिलाडूपणा दाखवेल यावर विश्वास ठेवत नाहीये.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा :
पुजाराचा स्वार्थ आणि परमार्थ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयाचा इतिहास घडवणारा टीम इंडियाा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने आपल्या झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन मायदेशातही कायम ठेवले. अतिशय चुरशीच्या झालेल्या कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात पुजाराने शतक करून आपल्या सौराष्ट्र संघाला पराभवाच्या वाटेवरून परत आणले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याने 49 वे शतक केले. पण हा आनंद पुजारा मोकळेपणे किंवा खुल्या मनाने साजरा केला असेल ? नक्कीच नाही. सौराष्ट्राच्या विजयाची आणि पुजाराच्या शतकापेक्षा त्याच्या खिलाडूवृत्तीचीच अधिक चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.
प्रेमात, युद्धात आणि आता खेळातही
प्रेमात, युद्धात आणि त्या जोडीला आता खेळामध्ये जिंकण्यासाठी सर्व काही माफ असते असे बोलले जात असले तरी प्रत्येक खेळात काही आदर्श आहेत, खिलाडूवृत्तीचे मुर्तीमंत उदाहरणेही आहेत. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, महेंद्रसिंग धोनी आणि आत्ता चेतेश्वर पुजारा. पण हा पुजारा सध्या अखिलाडूवृत्तीमुळे सध्या सोशल मिडियावर ट्रोल झाला आहे. कारणही तसेच आहे.
काय घडले?
कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात त्याच्या सौराष्ट्राला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान असताना त्यांची 3 बाद 23 अशी अवस्था झाली होती. पुजारा मैदानात आला आणि कमालीचा भेदक मारा करणाऱ्या विनय कुमारच्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड लागलेला चेंडू यष्टीरक्षक समर्थच्या हाती स्थिरावला, त्यानंतर जोरदार अपिल झाले. कर्नाटकच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. सौराष्ट्रासाठी त्यांचा खेळ खल्लासच झाला होता, परंतु पंचांना चेंडूंना बॅटची कडा लागलेला आवाज ऐकला नाही आणि पुजाराला त्यांना नाबाद ठरवले या जीवदानाचा फायदा घेत पुजाराने नाबाद 131 धावा करून संघाला अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. ही झाली घटना..कर्नाटकचे खेळाडू अजूनही विश्वास ठेऊ शकत नाहीत आणि क्रिकेट चाहते पुजारासारखा खेळाडू अखिलाडूपणा दाखवेल यावर विश्वास ठेवत नाहीये.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा :
पुजाराचा स्वार्थ आणि परमार्थ


from News Story Feeds http://bit.ly/2FSQqMG
No comments:
Post a Comment