नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.
I guess trolling isn't for me guys, I'll stick to getting trolled!
I spoke about how "these Indians" was mentioned in the comment and that's all. I’m all for freedom of choice. Keep it light guys and enjoy the festive season. Love and peace to all.— Virat Kohli (@imVkohli) November 8, 2018
कोहलीने म्हटले आहे की, हे ट्रोलिंग माझ्यासाठी नाही तसेच याकडे लक्ष द्यावे असे मला वाटत नाही. माझा सल्ला केवळ त्या लोकांसाठी होता ज्यांनी भारतीय फलंदाजीवर नकारात्मक टीका केली आहे. मला देखील बोलण्याचा आणि आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका दिवाळीचा आनंद घ्या, माझ्याकडून सर्वांना प्रेम आणि शांततेच्या शुभेच्छा. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला जे पाठिंबा देत नाहीत त्यांनी देशच सोडायला हवा, असे मत विराट कोहलीने व्यक्त केल्यामुळे वाद सुरू झाला होता. एका क्रिकेट चाहत्याने आपल्याला भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आवडतात, असे सांगितले होते. त्यावर, विराटने ही टिप्पणी केली होती. यानंतर विराटला सोशल मिडीयावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. म्हणून विराटने यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.
I guess trolling isn't for me guys, I'll stick to getting trolled!
I spoke about how "these Indians" was mentioned in the comment and that's all. I’m all for freedom of choice. Keep it light guys and enjoy the festive season. Love and peace to all.— Virat Kohli (@imVkohli) November 8, 2018
कोहलीने म्हटले आहे की, हे ट्रोलिंग माझ्यासाठी नाही तसेच याकडे लक्ष द्यावे असे मला वाटत नाही. माझा सल्ला केवळ त्या लोकांसाठी होता ज्यांनी भारतीय फलंदाजीवर नकारात्मक टीका केली आहे. मला देखील बोलण्याचा आणि आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका दिवाळीचा आनंद घ्या, माझ्याकडून सर्वांना प्रेम आणि शांततेच्या शुभेच्छा. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला जे पाठिंबा देत नाहीत त्यांनी देशच सोडायला हवा, असे मत विराट कोहलीने व्यक्त केल्यामुळे वाद सुरू झाला होता. एका क्रिकेट चाहत्याने आपल्याला भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आवडतात, असे सांगितले होते. त्यावर, विराटने ही टिप्पणी केली होती. यानंतर विराटला सोशल मिडीयावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. म्हणून विराटने यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.


from News Story Feeds https://ift.tt/2AVPRyh
No comments:
Post a Comment